Posts

कार्तिकी पौर्णिमे निमित्ताने, अंबोडे ता जि.पालघर येथील बुद्धविहारात दिपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न*आयोजक डॉ. निलेश राऊत - मित्र फाउंडेशन

Image
*कार्तिकी पौर्णिमे निमित्ताने, अंबोडे ता जि.पालघर येथील बुद्धविहारात दिपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न* आयोजक डॉ. निलेश राऊत - मित्र फाउंडेशन  पालघर ७ नोव्हेंबर  सफाळे ( एच लोखंंडे ) आशिया खंडात आणि भारत देशात प्रत्येक पौर्णिमा या दिवसाला प्रत्येक धर्मात, जातीत पंथात विषेस महत्व आहे. या अनुषंगाने अंबोडे ता.जि.पालघर येथील बुद्धविहारात कार्तिक पौर्णिमा, निमित्ताने  डॉ.निलेश राऊत मित्र फाऊंडेशन, पालघर यांच्या वतीने आणि नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट अंबोडे यांच्या सहकार्याने कार्तिक पौर्णिमा निमित्त दीप प्रज्वलित करण्यात आले.          यावेळी विपश्यना या विषयावर विपश्यना केंद्र अल्याली  ता. जि. पालघर येथील केंद्र शिक्षक आयु. अनिल जाधव यांनी  आलेल्या आपल्या बांधवांना बौद्ध पौर्णिमा आणि गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माची तत्व यावर समाज प्रबोधन करीत योग्य ते मार्गदर्शन केले. तर डॉ. निलेश राऊत यांनी विपश्यना आणि बौद्ध धम्म यावर आपले विचार मांडले. यावेळी उपस्थितांना मन एकाग्र करून मनावर ताबा कसे मिळवावा आणि आंतरिक शांती आणि सद...

वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम.

Image
*"वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम* दिनांक: 07 नोव्हेंबर 2025 तलासरी:(प्रतिनिधी) कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने तसेच ITI तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने "वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.           सर्वप्रथम दीपप्रज्वलन व भारत माता आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर वंदे मातरम् संदर्भात एक लघू नाटिकेची चित्रफित दाखविण्यात आली.       कार्यक्रमाची सुरुवात मा. अमोल पाठक (तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी तलासरी) यांच्या अध्यक्षीय भाषणांनी झाली . त्यामध्ये त्यांनी वंदे मातरम विषयी थोडक्यात मार्गदर्शन केले.       ...

अभिजित राणे : श्रमिकांच्या हृदयात जागा निर्माण करणारे नेतृत्व

Image
*अभिजित राणे : श्रमिकांच्या हृदयात जागा निर्माण करणारे नेतृत्व* "नेतृत्व म्हणजे पद नव्हे, ती लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची जबाबदारी आहे." — या एका वाक्यात कामगार नेते अभिजित राणे यांच्या जीवनदृष्टीचं सार सामावलेलं आहे. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव म्हणून ते केवळ कामगारांचे प्रतिनिधी नाहीत, तर त्यांच्या भावविश्वातील आशेचा किरण आहेत. त्यांच्या ८ नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विचारविश्वाचा आणि संघर्षमय प्रवासाचा वेध घेण्यासाठी हा संवाद साधला. सामाजिक संवेदनशीलतेचा, श्रमिक सन्मानाचा आणि न्यायनीतीचा ध्यास घेणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधण्याचा *गुरुदत्त दिनकर वाकदेकर* यांना सन्मान लाभला. संवादाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या शब्दांतून प्रामाणिकपणा, श्रमाची प्रतिष्ठा आणि कार्यकर्त्यांबद्दलची ममत्वपूर्ण बांधिलकी जाणवली. प्रश्न: आपल्या बालपणाने आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाने आजचा नेता घडवण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली? उत्तर: मी एका मध्यमवर्गीय, श्रमिक संस्कृतीत वाढलो. वडिलांचा प्रामाणिकपणा, आईची जिद्द आणि समाजातल...

कोकणरत्न' पदवीसाठी बाळ पंडित यांची निवड.

Image
'कोकणरत्न' पदवीसाठी बाळ पंडित यांची निवड. मुंबई : स्वतंत्र्य कोकणराज्य अभियान यांच्या वतीने 'कोकणरत्न' पदवीसाठी,  ज्येष्ठ पत्रलेखक, पत्रकार,  व सामाजिक कार्यकर्ते, विजय उर्फ बाळ पंडित यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन, यांची  'कोकणरत्न' पदवीसाठी निवड करण्यात आली आहे.        कोकणरत्न  पदवी प्रदान सोहळा शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत, मुंबई  मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान जवळ, मुंबई ४०००१ येथे स्वतंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक - संजय कोकरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी - वरिष्ठ पत्रकार व संपादक - सचिन  कळझुनकर  उपस्थित रहाणार आहेत.

कांद्रेभुरे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा रस्त्यासाठी वनजमिन परिवर्तन.

Image
कांद्रेभुरे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा रस्त्यासाठी वनजमिन परिवर्तन. ६ नोव्हेंबर  सफाळे ( एच लोखंंडे ) ग्रामपंचायत कांद्रेभुरे ता. जि. पालघर ( सफाळे पश्चिम ) या   ग्रामपंचायत हद्दीतील कांद्रेभुर मुख्य रस्ता ते सावरपाडा - भुरे पाडा येथील स्थानिक नागरिक यांना जाण्या येण्यासाठी असलेला रस्ता हा वनविभागाच्या मालकी जमीन असलेल्या भागातून असल्याने सदर रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण कॉक्रटीकरण करण्यासाठी अनेक कायदेशीर मान्यता मिळत नव्हत्या, परंतु या मान्यता मिळण्यासाठी व वनविभागाच्या ताब्यातील - मालकी जमीन. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्कांची मान्यता) मिळण्यासाठी श्री.जगदिश पाटील ग्रामपंचायत कांद्रेभुरे माजी सरपंच तथा माजी पालघर जिल्हा नियोजन सदस्य यांनी आपल्या कार्यकाळात ठरावाला मान्यता मिळवून व त्यानंतरही कांद्रेभुरे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयातून रस्त्याच्या जागेचा ३/२ चा ग्रामसभेत ठरावची मागणी करून मान्यता मिळाली होती.           सदर  रस्त्याच्या जागेची...

पालघर जिल्ह्यातील अखिल गोवर्धन ब्राम्हण संघांचा एकत्रित दीपोत्सव सोहळा आलेवाडी ,नांदगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.

Image
पालघर जिल्ह्यातील अखिल गोवर्धन ब्राम्हण संघांचा एकत्रित दीपोत्सव सोहळा आलेवाडी ,नांदगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा. दीपदान, त्रिपुरासुर दहन, तुळशी विवाह आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार या कार्यक्रमांनी रंगला भव्य सोहळा आलेवाडी (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील सर्व ब्राम्हण संघटनांचा एकत्रित दीपोत्सव सोहळा अखिल गोवर्धन ब्राम्हण संघ, आलेवाडी यांच्या पुढाकाराने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.पालघर तालुक्यातील आलेवाडी  गावातील तलावाजवळील परिसरात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मंगल वादन, श्री गणेश व श्री लक्ष्मी पूजन, तसेच दीपप्रज्वलनाने झाली. आलेवाडी परिसर सुंदर फुलांच्या आरासे, रांगोळ्या आणि लखलखत्या दिव्यांनी सजवण्यात आला होता. संध्याकाळी आयोजित दीपदान सोहळ्यात असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने तलाव परिसर उजळून निघाला आणि भक्तिभावाने वातावरण भारावून गेले. यानंतर पौराणिक परंपरेनुसार त्रिपुरासुर दहनाचा विधी पार पडला. चांगल्याचा वाईटावर विजय या प्रतीकात्मक कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणादायी संदेश मिळाला. तुळ...

महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.

Image
*महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, २ डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल आणि १० डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येतील. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हानिहाय नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे — १. पालघर: डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं.) २. रायगड: अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.) ३. रत्नागिरी:...