बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार एका आठवड्यात नाला साफसफाईच्या २७८ तक्रारी

*बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार* 
*एका आठवड्यात नाला साफसफाईच्या २७८ तक्रारी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाल्याच्या साफसफाईबद्दल तक्रारी नोंदवण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केल्याच्या एका आठवड्यात २७८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तथापि, त्यांच्या अहवालात, स्ट्रॉम वॉटर ड्रेन (एसडब्ल्यूडी) विभागाने नमूद केले आहे की यापैकी एकही तक्रार नाल्यांचे अयोग्य गाळ काढण्याशी संबंधित नाही. बहुतांश तक्रारी नाल्यांमधील तरंगणारे साहित्य आणि कचऱ्याच्या आहेत, असा दावा एसडब्ल्यूडीने केला आहे.

म्हणून, एसडब्ल्यूडीने घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभागाला पत्र लिहून नाल्यांमधील कचऱ्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, परंतु सदरचे नाले आपल्या अखत्यारीत नाहीत असे कारण देत त्यांनी हे पत्र नाकारले आहे.

अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एसडब्ल्यूएम विभागाला प्रभागनिहाय एजन्सी तैनात करण्यास सांगितले होते. परंतु अन्य अतिरिक्त आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या एसडब्ल्यूएमच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर नागरी संस्थेने तक्रार निवारण क्रमांक सुरू केला. १ जून रोजी ही सेवा सुरू झाली आणि आठवडाभरात २७८ तक्रारी आल्या. परंतु एसडब्ल्यूडीने सांगितले की, विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख नाल्यांबाबत केवळ १०२ तक्रारी होत्या. त्यापैकी ५० टक्के तक्रारी पूर्व उपनगरातील होत्या. या समस्येचे निराकरण केल्यानंतर किमान ८९ तक्रारी बंद करण्यात आल्या, तर १३ तक्रारी निराकरण करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

महानगरपालिकेने शहरातील नाले आणि नद्यांमधून ११.५२ लाख टन गाळ काढला आहे जो लक्ष्यित प्रमाणापेक्षा १७ टक्के जास्त आहे. एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, या वर्षी साफसफाईची प्रक्रिया लवकर सुरू झाली आणि ती अंतिम मुदतीच्या एक आठवडा आधी पूर्ण झाली.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी