सामुदायिक विवाह सोहळयाचे यंदा ६वे वर्षे डोंबिवली
सामुदायिक विवाह सोहळयाचे यंदा ६वे वर्षे डोंबिवली मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील ) पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान,मानपाडा रोड,सागांव डोंबिवली पूर्व येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. आतापर्यत सामुदायिक विवाह सोहळयात ३९ शुभलग्न धुमधक्यात संपन्न झाले आहेत. यंदा ७ शुभविवाह धुमधडाक्यात पार पडली. याचे श्रेय आगरी समाज प्रबोधन संस्था सर्व कार्यकर्ते तसेच मा. आमदार राजूदादा पाटील यांना जाते कारण प्रत्येक जोडप्यास एक लाख रूपये मानधन दिले जाते. आणि पुढेही देणार भले कितीही लग्न जुळूदे असे मा.आमदार राजूदादा पाटील यांनी व्यासपीठावर जाहीर केले. त्यांनी संस्थेचे ही कौतुक केले.ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे अशा लोकांनी जरूर आपल्या कुवती प्रमाणे लग्न कार्यात खर्च करावा. पण कर्ज काढून आयुष्यभर हप्ते भरत बसू नये. त्याला पर्याय म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेत नाव नोंदणी करून सामुदायिक विवाह सोहळा उत्तम पर्याय आहे. येथे आपल्या घराच्या सारखा लग्नसोहळा आयोजित केला जातो. वधुवर व आपले वराडी उपस्थित राहायचे आहे. भटजी,हारतुरे, पोळापापडी, सर्व धार्मिक विधी ...